धोका वाढला, तिसऱ्या लाटेआधीच राज्यात 25 दिवसात 4 हजार 500 मुलं कोरोनाबाधित. राज्यातील मंदिरे आणि शाळा कॉलेज सध्या तरी उघडण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊनच मंदिर आणि शाळा कॉलेज उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. सप्टेंबरच्या मध्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.