महाड, चिपळूण आणि साताऱ्यात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर आणि सांगलीमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंदगडच्या ताम्रपर्णी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोयना धरणात एका दिवसात 12 टीएमसी पाणी येण्याचा शक्यता आहे. मात्र, गेल्या 24 तासात 18 टीएमसी पाणी आल्याची माहिती मिळते आहे.