गैरवर्तनाच्या कारणावरून भाजपचे 12 आमदार निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आज BJPच्या 12 निलंबित आमदारांचा निर्णय होणार आहे. आता निलंबित आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. पुढे काय होणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला होता. काही आमदारांनी तालिका अध्यक्षांचा माईक ओढला. तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली होती. त्यामुळे अध्यक्ष प्रचंड संतप्त झाले होते आणि त्यांनी या 12 आमदारांचं निलंबन केल होतं.