मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावरील (Maharashtra Political Crisis) आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. यावर शिंदेगटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता पुढची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांचे भाकीत खोटे ठरणार आहे, असं केसरकर म्हणालेत. फेब्रुवारीपर्यंत शिंदे-फडणवीस टिकणार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. त्याला केसरकरांनी उत्तर दिलंय. न्यायालयीन प्रक्रिया असल्याने मी यावर फार काही बोलणार नाही, असं केसरकर (Deepak Kesarkar) म्हणालेत.