गांधीनगर : गुजरातला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. वलसाडमध्ये पूर आला आहे. अनेक घरे पाण्याखाली गेले आहेत. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ टीमकडून बचावकार्य सुरू आहे. दुसरीकडे महाराष्ट्राला देखील मुसळधार पाऊस सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नद्या -नाल्यांना पूर आलाय.