हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याची तोडफोड करण्यात आली आहे. सोलापुरातील इंद्रेश्वर साखर कारखान्याची शेतकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. पाच महिन्यांपासून ऊसाच्या एफआरपीची रक्कम न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. एफआरपी द्या अन्यथा कारखान्याला टाळं ठोकणार, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. कारखान्याच्या गेटवर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं.