Aaditya Thackeray | ‘पर्यावरण वाचवून शाश्वत विकास होत असेल, तर मी त्या बाजूने’

| Updated on: Feb 13, 2022 | 4:54 PM

पर्यावरण वाचवून शाश्वत विकास होत असेल, तर मी त्या बाजूने आहे, त्या संदर्भात मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  म्हणाले आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीवरही भाष्य केलं.

Follow us on

नागपूरच्या (Nagpur) अजनी वनच्या संदर्भात आम्ही नागपूरच्या नेत्यांसोबत संघर्षाच्या भूमिकेत नाही. अजनी वनासाठी स्थानिक नागरिकांकडून आम्हाला अनेक तक्रारी आल्या होत्या. अजनी वन वाचण्यासाठी ते आग्रही आहेत. असं नाही की स्टेशन कोणाला नको आहे. जर पर्यावरण वाचवून शाश्वत विकास होत असेल, तर मी त्या बाजूने आहे, त्या संदर्भात मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  म्हणाले आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीवरही भाष्य केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही निवडणूक लढवत असतो. आमच्या सगळ्या आघाड्या आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवत असतो, असे ते म्हणाले. गोव्यात उद्या मतदान आहे, त्यामुळे काहीही बोलू नये, असे आवाहन त्यांनी केले.