वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितली A टू Z माहिती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. या भेटीवेळी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे देखील उपस्थित असल्याची चर्चा रंगली होती.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. या भेटीवेळी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे देखील उपस्थित असल्याची चर्चा रंगली होती.
या चर्चांवर आता जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “मी हॉलमध्ये बसलो होतो. ते बऱ्याच वेळाने आले. मुख्यमंत्री म्हणाले की, गडबड सुरू आहे आणि बैठक सुरू आहे. त्यांनी काय काम आहे असे विचारले. त्यानंतर मी त्यांना माहिती दिली.”
जयंत पाटील म्हणाले, “आम्ही अपील करणार असल्याचे सांगितले होते. नगरविकास मंत्र्यांकडे अपील करावे लागते. मात्र, त्यावेळी नगरविकास मंत्री उपस्थित नव्हते.”
ते पुढे म्हणाले, “मी हॉलमध्ये एकटाच होतो. तटकरे आले होते की नाही हेही मला माहिती नाही. विलिनीकरणाच्या चर्चेशी या भेटीचा कोणताही संबंध नाही. नगराध्यक्ष अपात्र प्रकरणाबाबतच ही भेट झाली होती.”
