चाळीसगाव, जळगाव : शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने बंड केलं होतं, हे तानाजी सावंतांनी हे खरं वक्तव्य केलं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले. तानाजी सावंत हे खरं बोलताय, असंही देखील यावेळी जयंत पाटील म्हणाले. शिंदे गट भाजपसोबत गेल्यामुळे शिंदे गटाचं तर रेटिंग कमीच आहे. पण असंगाशी संग केल्यामुळे भाजपचं पण रेटिंग लोकप्रियता घसरली आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.