“नाना पटोले काय म्हणाले हे मला माहित नाही. पण आज आम्ही बैठक घेऊन विरोधी पक्षाची भूमिका कशी असली पाहिजे, यावर विचारविनिमय करू. भाजपला ज्यांना ज्यांना विरोध करायचा आहे, त्या पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या अवैध सरकारला विरोध करण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून काम करतोय. नाना पटोले नेमकं काय म्हणाले हे मला माहित नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याची मला आवश्यकता वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. आमची आघाडी काही पर्मनंट नाही, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून महाविकास आघाडी तुटण्याचे संकेत देण्यात आले.