राज्यसभा निवडणुकीचा निकाला लागला आहे. या निवडणुकीत धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. या निकालावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरू झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान या निवडणुकीवरून आता आरोप -प्रत्यारोपाचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.