कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत.. राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. “सावरकरांविषयी सर्वांनाच आदर आहे. पण सध्या सावरकरांकडे मुद्दा नेण्यापेक्षा लोकशाहीकडे घेऊन जाण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एननाथ शिंदे सावरकर गौरवयात्रा काढत आहेत. पण त्यामुळे राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न सुटणार आहेत का?”, असा सवालही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईची क्रोनोलॉजी तपासण्याची गरज आहे. मग लोकशाही जिवंत आहे का याचे उत्तर मिळेल, असंही अमोल कोल्हे म्हणालेत.