रत्नागिरी : गेल्या आठवडाभरापासून मुंबई, पुणे, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे रत्नगिरी-मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. घाटात दरड कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. तसेच यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. मुसळधार पावसामुळे हा सर्व प्रकार घडला आहे. (landslide in Mumbai-Goa highway Nivli Ghat due to heavy rain)