पुणे : समीर वानखेडेंवर केलेले आरोप शंकास्पद आहेत. याचा फायदा हा आर्यन खान आणि अनन्या पांडे यांना जामीन मिळवण्यासाठी होऊ शकतो. कारण आता चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप लावण्यात आलेत. या सगळ्या प्रक्रfयेत यंत्रणांचा मात्र राजकीय वापर झालाय. चॅटच्या आधारे जामीन नाकारणं हे कायदेशीरदृट्या चुकीचं आहे. मात्र आता अनन्यानं तब्येत खराब असल्याचा अर्ज एनसीबीला दिलाय, त्यामुळे एनसीबी आता तिला चौकशीसाठी बोलावणार नाही. मात्र चौकशीची गती मंदावू शकते, अशी प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी दिली आहे.