राज्यात एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला. या बंडखोरीत शिंदेंनी आपल्यासोबत तब्बल 40 आमदार घेतले. या बंडखोरीत शिंदेना साथ भाजपाने दिल्याचा आरोप नेहमीच केला जातो. शिंदेंनी राज्यात भाजपाच्या मदतीने सत्तास्थापन केलीयं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. परंतू मंत्री मंडळ विस्तार रखडल्याने शिंदे सरकारला टार्गेट केले जात होते. त्यानंतर आता राज्यात मंत्री मंडळ विस्तार झाला असून 19 मंत्र्यांचा शपथ विधि देखील पार पडलाय. आज रात्री किंवा उद्यापर्यंत मंत्र्यांना खाते वाटप होण्याची शक्यता आहे.