आजपासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आजपासून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पास पाहूनच प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जात असताना अंबरनाथ स्थानकात मात्र पास तपासण्याची कोणतीच सुविधा नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अंबरनाथ स्थानकात कोणीही घुसत असून अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसह इतर प्रवाशीही लोकलमधून प्रवास करताना दिसत आहेत. एकीकडे 15 ऑगस्टपासून कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली असली, तरी आता सुद्धा सरसकट सर्वच प्रवासी बिनबोभाटपणे लोकलने प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे.