राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत सापडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रुग्णसंख्येला नियंत्रण घालण्यासाठी कंबर कसली आहे. महापालिका आयुक्तांनी तर दिवसाला 20 हजार रुग्ण सापडले तर लॉकडाऊनचं सुतोवाच केलं आहे. मात्र, दिवसाला 25 हजार रुग्ण आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठीचा महापालिकेने अॅक्शन प्लान तयार केला आहे. मुंबईत दररोज 20 ते 30 टक्के रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. दिवसाला 25 हजार रुग्ण आले तरी पालिकेचा अॅक्शन प्लॅन तयार आहे. बेड, आरोग्य कर्मचारी-डॉक्टर्स, औषधे अशी सर्व प्रकारची तयारी महापालिकेने केली आहे.