मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग रोखण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. कॅबिनेटमध्ये राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाऊन लावावे,यासाठी काही मंत्री आग्रही आहेत. वाढत्या रुग्णसंख्येत संचारबंदी लावूनही ही फरक पडला नसल्यानं कडक लॉकडाऊनची मागणी जोर धरत आहे.