26\11 बाबत मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष चतुर्वेदींचा खळबळजनक दावा अन् शरद पवारांवर गंभीर आरोप

26\11 बाबत मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष चतुर्वेदींचा खळबळजनक दावा अन् शरद पवारांवर गंभीर आरोप

Harshada Shinkar | Updated on: Sep 16, 2025 | 2:56 PM

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेले सुधाकर चतुर्वेदी यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. चतुर्वेदी यांच्या घरी पुरावे लावण्यात आल्याचा आणि करकरे यांच्या मृती पवारांचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणातील अन्यायाविरुद्ध त्यांच्या लढ्याची ही कहाणी आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सुधाकर चतुर्वेदी यांना निर्दोष सोडण्यात आले. मात्र, सुधाकर चतुर्वेदी यांनी या प्रकरणात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुधाकर चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरी पुरावे लावण्यात आले होते आणि हे षडयंत्र शरद पवार यांच्या सांगण्यावरून झाले होते. सुधाकर चतुर्वेदींनी हे आरोप पुराव्यांसह मांडले आहेत. यावेळी, २६/११ मुंबई हल्ल्यातील हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबतही सुधाकर चतुर्वेदी यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, हेमंत करकरे यांची हत्या काँग्रेसने केली होती आणि शरद पवार यांना याची माहिती होती. चतुर्वेदी यांनी १७ वर्षांपासून या अन्यायाविरुद्ध लढा दिला आहे आणि त्यांना न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे.

Published on: Sep 16, 2025 2:56 PM
Follow Us