Mumbai Water Cut : मुंबईकरांनो.. पाणी जरा जपून वापरा, मंगळवारपासून 3 दिवस ‘या’ भागात पाणीकपात

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो.. पाणी जरा जपून वापरा, मंगळवारपासून 3 दिवस ‘या’ भागात पाणीकपात

| Updated on: Oct 04, 2025 | 10:31 AM

मुंबईत 7 ते 9 ऑक्टोबरदरम्यान तीन दिवसांसाठी 10% पाणीकपात लागू होणार आहे. पिसे-पांझरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत मीटर अद्ययावतीकरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शहर आणि पूर्व उपनगरांमधील कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, मुलुंड या क्षेत्रांना फटका बसणार आहे.

मुंबईत येत्या मंगळवारपासून तीन दिवसांसाठी पाणीकपात केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत शहर आणि पूर्व उपनगरांमधील काही भागांमध्ये 10 टक्के पाणीपुरवठा कपात लागू होईल. पिसे-पांझरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत मीटर अद्ययावतीकरण कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या पाणीकपातीमुळे पूर्व उपनगरांमधील अनेक भागांना फटका बसणार आहे.

यामध्ये कुर्ला पूर्व, विक्रोळी पूर्व आणि पश्चिम, घाटकोपर पूर्व या क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, मुलुंड पूर्व आणि पश्चिम या भागांमधील रहिवाशांनाही 10 टक्के कमी पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे ही कपात तात्पुरत्या स्वरूपात लागू केली जात आहे.

Published on: Oct 04, 2025 10:31 AM