जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो – CM फडणवीस

जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो – CM फडणवीस

| Updated on: May 23, 2026 | 6:02 PM

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगरमध्ये निबे समूहाच्या अत्याधुनिक संरक्षण उत्पादन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्योगपती गणेश निंबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगरमध्ये निबे समूहाच्या अत्याधुनिक संरक्षण उत्पादन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्योगपती गणेश निंबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात गणेश निंबे यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. “गणेश निंबे यांच्याकडे आत्मविश्वास असल्यामुळेच हा मोठा प्रकल्प उभा राहिला आहे. त्यांनी तयार केलेली संरक्षण उत्पादने देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत,” असे ते म्हणाले.

या कॉम्प्लेक्समध्ये तयार होणारे शेल्स आणि इतर संरक्षण साहित्य देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्षभर उत्पादन सुरू राहील, अशी तयारी कंपनीने केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच भविष्यात सी प्लेन तयार करण्याची तयारीही निबे समूहाने सुरू केल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

“ऑपरेशन सिंदूरमधून भारताची ताकद जगाने पाहिली. जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो,” असेही मुख्यमंत्री म्हणाले. अहिल्यानगर आता डिफेन्स क्लस्टरचे मोठे केंद्र बनत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Published on: May 23, 2026 6:02 PM
Follow Us