Operation Sindoor : लोक ठार, 20 टक्के पायाभूत सुविधा नष्ट; ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
India - Pakistan Conflict : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचं मोठं नुकसान झालेलं आहे.
भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक युद्ध विमानं तसंच अधिकाऱ्यांसह 50 जणांचा मृत्यू झालेला आहे. स्क्वॉड्रन लीडर उस्मान यूसुफ आणि 4 एअरमॅनसह 50 लोक यात ठार झालेले आहेत.
भारताने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या 9 तळांना उद्ध्वस्त केलं आहे. त्यानंतर भेदरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी भारताकडून झालेल्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यात पाकिस्तानच नुकसान झालेलं आहे. यात पाकिस्तान हवाई दलाच्या 20 टक्के पायाभूत सुविधा नष्ट झालेल्या आहेत. दहशतवादी बंकर आणि पाकिस्तान लष्कराच्या अनेक चौक्या देखील नष्ट झालेल्या आहेत.
Published on: May 14, 2025 04:38 PM
