Prakash Mahajan :  फक्त माझी पंकू ताई… गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार… क्या जमाना आ गया…  प्रकाश महाजन काय म्हणाले?

Prakash Mahajan : फक्त माझी पंकू ताई… गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार… क्या जमाना आ गया… प्रकाश महाजन काय म्हणाले?

Harshada Shinkar | Updated on: Oct 23, 2025 | 3:45 PM

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार म्हटले होते. या विधानानंतर प्रकाश महाजन यांनी फेसबुक पोस्टद्वारे पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते, स्वर्गीय मुंडे साहेबांचा सामाजिक किंवा राजकीय वारसा फक्त पंकजा मुंडे यांनाच मिळतो.

गोपीनाथ मुंडेंच्या वारसा हक्कावरून सुरू असलेल्या चर्चेत प्रकाश महाजन यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार ठरवल्यानंतर, प्रकाश महाजन यांनी फेसबुक पोस्टद्वारे यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार असल्याचे म्हटले आहे.

आपल्या पोस्टमध्ये प्रकाश महाजन यांनी प्रश्न विचारला आहे की, स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसदार कोण ठरवत आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे काही व्यक्तींवर टीका केली. एका व्यक्तीचा उल्लेख “भ्रष्टाचारी कारागृहात बरेच महिने काढून आलेला” असा केला, तर दुसऱ्या व्यक्तीबाबत “रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते” असे म्हटले आहे. प्रकाश महाजन यांच्या मते, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा सामाजिक असो किंवा राजकीय, कोणताही वारसा फक्त आणि फक्त पंकजा मुंडे यांच्याकडेच आहे. “दुसरं कोणी नाही,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Oct 23, 2025 3:38 PM
Follow Us