काल पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलायं. त्यानंतर या विषयावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले दिसते आहे. यावर प्रतापराव जाधव यांनाही प्रतिक्रिया दिली असून यांनी या हल्लाचा निषेध केलायं. तसेच यावेळी प्रतापराव जाधव यांनी आदित्य ठाकरेंवर टीका देखील केलीयं. उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्लाचा एकनाथ शिंदे गटाकडून निषेध केला जातोयं. तर शिवसेनेच्या अनिल देसाईंनी या हल्लाचे समर्थन केले आहे. दरम्यान, काल उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. संभाजी थोरवे, सूरज लोखंडे, संजय मोरे आणि बबन थोरात आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे