रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे तीन संशयित बोटी सापडल्या होत्या. या प्रकरणी आता एटीएस बरोबरच एनआयए देखील तपस करणार आहे. एनआयएची टीम हरिहरेश्वर येथे दाखल झाली आहे. हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीत 3 AK-47 रायफल, लाईफ गार्ड आणि काही काडतुसे मिळाली होती. त्यानंतर हे प्रकरण थेट अधिवेशनात देखिल गाजले. घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्याचा तपास स्थानिक पोलिस प्रशासन आणि एटीएस करत आहे. दरम्यान बोटीवर 3 AK-47 बंदुका असणारा बॉक्स एटीएस कडून जप्त करण्यात आलेला आहे.