मुंबई : उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) केवळ तीन लोक राहतील, असं म्हणत आमदार रवी राणा यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब हे तीनच लोक शिल्लक राहतील, असं राणा (Ravi Rana) म्हणालेत. 90 टक्के शिवसेनेचे नेते हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंनाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.