सध्या राज्यासह देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुजरातमध्ये देखील जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे तापी नदीवर असलेल्या उकाई धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. उकाई धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने, धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.