Kolhapur | अंबाबाई मंदिरातील निर्बंध पुन्हा कडक होणार, ई-पासची संख्या कमी करणार

Kolhapur | अंबाबाई मंदिरातील निर्बंध पुन्हा कडक होणार, ई-पासची संख्या कमी करणार

| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 8:07 PM

गर्दी टाळण्यासाठी एक तासातील ईपासची संख्या कमी केली जाणार आहे. तासाला बाराशे भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. सध्या एका तासात पंधराशे भाविक दर्शन घेता येत होते. आवश्यकता वाटल्यास ही संख्या सातशेपर्यंत खाली आणली जाणार आहे.

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील निर्बंध पुन्हा कडक केले जाणार आहेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन खबरदारी घेत आहे. गर्दी टाळण्यासाठी एक तासातील ईपासची संख्या कमी केली जाणार आहे. तासाला बाराशे भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. सध्या एका तासात पंधराशे भाविक दर्शन घेता येत होते. आवश्यकता वाटल्यास ही संख्या सातशेपर्यंत खाली आणली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांची tv9 ला माहिती दिली.

Follow Us