माझ्याबाबत कुणी अफवा पसरवत असेल तर मानहानीचा दावा ठोकणार- संजय शिरसाट

| Updated on: Sep 15, 2022 | 4:30 PM

"मी नाराज असल्याचं कारण काय? हे मिळेल, ते मिळेल म्हणून आम्ही उठाव केला का? असं नाहीये. आमचा उठाव हा विचारांचा होता. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा उठाव होता," असं शिरसाट म्हणाले.

Follow us on

“मी नाराज असल्याचं कारण काय? हे मिळेल, ते मिळेल म्हणून आम्ही उठाव केला का? असं नाहीये. आमचा उठाव हा विचारांचा होता. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा उठाव होता. तो विचार आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. जेव्हा आम्ही 50 आमदार गेलो, तेव्हा एकमुखी निर्णय घेण्यात आला होता की शिंदे साहेब जे ठरवतील, ते आम्हाला मान्य असेल. म्हणून नाराजीचा कुठेही प्रश्न नाही”, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं. संजय शिरसाट हे नाराज असल्याच्या चर्चांना वारंवार उधाण येतं. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.