“मी काल रात्री इमारतीखाली उभा होतो. ठाकरे गटाचे ५० लोक माझ्याजवळ आहे आणि म्हणाले, बोल आता काय करायचं? मी एकटाच होतो. पण मीसुद्धा कमी नाही. मला फक्त उद्धव ठाकरेंचं वाईट वाटतं. पूर्वीची शिवसेना राहिली नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक आहोत. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा तिथे कोणतीच फायरिंग झाली नव्हती. फायरिंग ही वाघावर करता येते, पण शेळ्यांवर काय फायरिंग करणार?”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे शिवसेना शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी दिली.