काही दिवसांपूर्वीच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी फोडलेल्या लेटर बॉम्बनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘सत्ता गेल्यापासून काही लोकांची पोटदुखी सुरू झाली आहे. त्यामुळे विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही’ असं म्हणत थेट भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.