Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या निधनानंतर काय घडलं? तो निर्णय मी बदलला अन्… रामदास कदमांचा सर्वात मोठा दावा!

Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या निधनानंतर काय घडलं? तो निर्णय मी बदलला अन्… रामदास कदमांचा सर्वात मोठा दावा!

| Updated on: Oct 03, 2025 | 5:14 PM

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरच्या घडामोडींवरून आव्हान दिले आहे. उच्चस्तरीय चौकशी झाल्यास उद्धव ठाकरे अडचणीत येतील, असा इशारा कदम यांनी दिला.

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरच्या काही घडामोडींवरून गंभीर आरोप केले आहेत. जर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली, तर उद्धव ठाकरे अडचणीत येऊ शकतात, असा इशारा कदम यांनी दिला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांचे आरोप नाकारण्याचे खुले आव्हान दिले. रामदास कदम यांनी दावा केला की, बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह सकाळी सहा वाजता रुग्णवाहिकेतून शिवाजी पार्कला नेण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता, तो त्यांनी आणि बाळा नांदगावकरांनी बदलला. एका शाखाप्रमुखाप्रमाणेच बाळासाहेबांना सन्मानपूर्वक नेण्याची त्यांची भूमिका होती.

माध्यमांसमोर घोषणा करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः का आले नाहीत, असा सवालही कदम यांनी विचारला. तसेच, दिवाळीमुळे बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस घरी ठेवल्याचे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे आणि हाताचे ठसे कशासाठी घेतले, याचेही स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

Published on: Oct 03, 2025 05:14 PM