कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. छत्तीसगडच्या धर्मसंसदेत त्यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यांनी नथुराम गोडसेंचं गुणगान गायलं. यामुळे दिवसभर प्रचंड वाद झाला होता. कालीचरण महाराजांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्तीसगडमध्ये कालीचरण महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळालेत. त्यानंतर कालीचरण महाराजांच्या अटकेची मागणी सभागृहात करण्यात आली. नवाब मलिकांनी कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत टीका केली आणि निषेधही व्यक्त केला. कालीचरण महाराजांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिवीगाळ करण्याच्या वक्तव्यावरुन सभागृहात विरोधक आणि सत्ताधारीदेखील आमनेसामने आले होते.