परिवहन महामंडळाच्या विलीनीकरणाचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाकडून 22 तारखेला या विलीनीकरणाचा निकाल देण्यात येईल त्याच वेळी हे सरकार एसटी कामगारांच्या बाजूने आहे की विरोधात आहे हे सिद्ध होईल. त्यामुळे 22 तारखेच्या उच्च न्यायालयाच्या निकालाची उत्सुकता सगळ्यानाच लागली आहे. उच्च न्यायालयात सादर झालेला अहवाल मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेसह सादर झाला आहे. त्यामुळे सलग तीन महिने चाललेल्या या आंदोलनामुळे आता एसटी कामगारांच्या पदरात काय पडणार हे आाता न्यायालयाचा निकालाच ठरवणार आहे. या आंदोलनानंतर निकाल दिला नसल्याने सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.