Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
राज्यातील राजकारणात आगामी घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, शिवसेना (ठाकरे गट)च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वक्षमतेचे कौतुक करत त्यांनी अर्थखात्याबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.
राज्यातील राजकारणात आगामी घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, शिवसेना (ठाकरे गट)च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वक्षमतेचे कौतुक करत त्यांनी अर्थखात्याबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर राज्याचे अर्थखाते प्रभावीपणे सांभाळण्याची क्षमता जयंत पाटील यांच्यामध्ये आहे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून चांगली जबाबदारी पार पाडू शकतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी जयंत पाटील हे महाविकास आघाडीसोबत असल्यामुळे काही राजकीय अडचणी निर्माण होत असल्याचाही दावा केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विश्वासार्हतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः आगामी राजकीय घडामोडी, संभाव्य समीकरणे आणि महाविकास आघाडी तसेच महायुतीतील हालचालींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता या विधानावर संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
