Uday Samant :  राज ठाकरेंच्या मागे युतीसाठी ही मंडळी हात धुवून… उदय सामंतांचा निशाणा कुणावर? अन् स्थानिक निवडणुकांवर केलं मोठं वक्तव्य

Uday Samant : राज ठाकरेंच्या मागे युतीसाठी ही मंडळी हात धुवून… उदय सामंतांचा निशाणा कुणावर? अन् स्थानिक निवडणुकांवर केलं मोठं वक्तव्य

| Updated on: Oct 21, 2025 | 4:10 PM

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर महायुतीची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी चिपळूणमधील वक्तव्यावर ठाम राहत, काही स्थानिक नेत्यांच्या आक्रमकतेला उत्तर दिले. तसेच, ठाकरे गट राज ठाकरे यांच्या मागे युतीसाठी हात धुवून लागल्याचे सांगत, राज ठाकरे भाग्यवान असल्याचे मत व्यक्त केले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. चिपळूणमध्ये केलेल्या आपल्या वक्तव्यावर ते आजही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी आणि कोकणात महायुतीनेच निवडणुका लढवण्यावर त्यांनी भर दिला, कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. स्थानिक पातळीवरील काही नेत्यांकडून होणाऱ्या आक्रमक वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना (एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस) त्रास होऊ नये म्हणून संयम बाळगल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

मात्र, रोजच्या आव्हानांना सामोरे जाताना नाइलाजाने आपल्याला कठोर भूमिका घ्यावी लागल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील कथित वादावर बोलताना, महायुतीचे निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेच घेतात, असे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महायुतीने गोपनीय फॉर्म्युला ठरवला असून, तो योग्य वेळी जाहीर होईल असेही सामंत यांनी सूचित केले.

Published on: Oct 21, 2025 04:10 PM