जळगाव अवकाळीची झळ, फुलबागांना फटका; बळीराजा संकटात

| Updated on: Mar 20, 2023 | 9:26 AM

अवकाळी पावसाचा फुलबागांनाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फुलबागांमधील फुलं गळून पडली आहेत

Follow us on

जळगाव : राज्यात अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यांना फटका दिला आहे. अनेक जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे नुसकान हे अवकाळी पावसामुळे झाले आहे. अवकाळी पावसाचा असाच फटका जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. अवकाळी पावसाचा फुलबागांनाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फुलबागांमधील फुलं गळून पडली आहेत. फुलबागेतील दररोजच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र अवकाळी पावसामुळे फुलं गळून पडल्याने बाजारातही फुलांना भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.