AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचं डोकं फिरलं.. सलमान खान अतिरेकी घोषित, होऊ शकते अटक? काय आहेत नियम?

सलमान खानच्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तानमधल्या शाहबाज सरकारला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. म्हणून त्यांनी थेट सलमानला दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे सलमानला अटक होऊ शकते का, यासंदर्भातले नियम काय आहेत.. ते जाणून घेऊयात..

पाकिस्तानचं डोकं फिरलं.. सलमान खान अतिरेकी घोषित, होऊ शकते अटक? काय आहेत नियम?
सलमान खानImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 26, 2025 | 1:09 PM
Share

अभिनेता सलमान खानला पाकिस्तान सरकारने ‘दहशतवादी’ घोषित केलं आहे. यामागचं कारण म्हणजे सलमानने सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात बलुचिस्तानबद्दल केलेलं वक्तव्य. या कार्यक्रमात सलमानने पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला. यामुळे पाकिस्तान सरकारला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. या वक्तव्यानंतर नाराज झालेल्या पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने एका अधिकृत अधिसूचना जारी करत सलमानला थेट दहशतवादी म्हणून घोषित केलंय. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी अधिनियमांतर्गत पाकिस्तानने हे पाऊल उचललं आहे. यासोबतच सलमानचं नाव फोर्थ शेड्युलमध्ये टाकलं आहे. याचा नेमका अर्थ काय असतो आणि पाकिस्तानी पोलीस सलमानला अटक करू शकते का, त्याबद्दल जाणून घेऊयात..

पाकिस्तानची फोर्थ शेड्युल यादी म्हणजे काय?

पाकिस्तानच्या 1997 च्या दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत फोर्थ शेड्युलमध्ये दहशतवादी किंवा अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची यादी आहे. या यादीत समाविष्ट असलेल्यांना पाकिस्तानमध्ये प्रवास करण्यास निर्बंध लादला जातो. त्यांची पाकिस्तानमधील मालमत्ता गोठवली जाते आणि त्यांच्यावर कडक पाळत ठेवली जाते. परंतु ही देशांतर्गत कायदेशीर तरतूद असल्याने फक्त पाकिस्तानातच हे नियम लागू होतील.

पाकिस्तानी पोलीस सलमान खानला अटक करू शकतात का?

प्रत्येक देशाचे कायदे वेगळे असतात. त्यामुळे पाकिस्तानी कायदा अंमलबजावणी संस्थांना भारतात कोणतेही अधिकार क्षेत्र नाहीत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सलमानला दहशतवादी घोषित केल्यानंतर त्यांना भारतीय हद्दीत त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नाही. जरी पाकिस्तानने सलमानविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली, तरी त्याला प्रत्यार्पण करार किंवा परस्पर कायदेशीर सहाय्य कराराची मदत घ्यावी लागेल. परंतु भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणताही प्रत्यार्पण करार झालेला नाही. त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध जवळपास अशक्यच आहेत.

आंतरराष्ट्रीय कायदा काय म्हणतो?

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, सीमापार अटक केवळ इंटरपोल रेड नोटीससारख्या अधिकृत कायदेशीर यंत्रणेद्वारेच केली जाऊ शकते. ही अटक केवळ दहशतवाद किंवा युद्ध यांसारख्या गंभीर जागतिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्येच केली जाऊ शकते. शिवाय कोणतीही कारवाई करण्यापूर्वी विश्वासार्ह आणि ठोस पुरावे सादर करणं आवश्यक आहे. पाकिस्तानने सलमानला जरी दहशतवादी म्हणून घोषित केलं असलं तरी ही कारवाई त्याच्या फक्त वक्तव्यावर आधारित आहे, कोणत्याही गुन्हेगारी कृतीवर नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...