Maharashtra News LIVE : बापरे, लाडकी बहिण योजनेत इतक्या लाख बहिणी ठरल्या अपात्र
Maharashtra News LIVE Updates : धाराशिव जिल्ह्यात आज पहाटे पुन्हा अवकाळी पाऊस बरसला असून धाराशिव, कळंब तालुका वाशी तालुका व तुळजापूर तालुका या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

LIVE NEWS & UPDATES
-
फळबागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका
धाराशिव जिल्ह्यात काल रात्री उशिरा आणि पहाटे तीन वाजता जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बीच्या पिकासह फळबागांचे मोठं नुकसान झालंय काढून टाकलेली ज्वारी,गहू कांदा इतर पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे धाराशिव जिल्ह्यात पंधरा दिवसापासून लगातार अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी मोठा अडचणीत सापडलाय.
-
अशोक खरातच्या पत्नीचा दोन दिवसांपासून पोलीस यंत्रणांना लागेना शोध
SIT आणि शिर्डी पोलीसांची पथके फरार कल्पनाच्या मागावर. कल्पनाचा मोबाईलही नॉट रिचेबल असल्याने लोकेशन मिळण्यात अडचणी येत असल्याची सूत्रांची माहिती. खरात कुटुंबाचा देखिल आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असतांनाच SIT कडून कुटुंबावर वॉच का ठेवण्यात आला नाही ? हा देखिल प्रश्न उपस्थित
-
-
गेवराईमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक एकरवरील बाजरी पीक जमीनदोस्त
बीडच्या गेवराईमध्ये काल गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामध्ये ज्वारीसह उन्हाळी बाजरी पीक जमीन दोस्त झाले आहे. गारांचा मारा बसल्याने धान्य देखील खराब होऊ लागले. सुरुवातीला कही ठिकाणचे पंचनामे झालेले आहेत मात्र सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणात नुकसान असून पंचनामे झालेले नाहीत. प्रशासनाने पंचनामे करावेत आणि मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
-
एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
खरातच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघडकीस. अशोक खरातने रोख व्यवहारातून उभं केलं आर्थिक साम्राज्य. कोणताही अधिकृत हिशोब नसल्याची शक्यता. ३ दिवसांत खरातच्या तीनदा बँक खात्यांची एसआयटीने तपासणी. व्यवहारांची साखळी उलगडण्यास सुरुवात; मोबाईल मधून डेटा जप्त, महत्त्वाचे पुरावे हाती. खरातची चार वर्षांत सुमारे ७० कोटींची प्रॉपर्टी खरेदी. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमधे मोठी गुंतवणूक
-
भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप
‘श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी’मार्फत कांदा खरेदी-विक्री व्यवहार. मार्च 2024 मध्ये संशयास्पदरीत्या कंपनीला नाफेडची मान्यता. 250+ कंपन्या इच्छुक असताना खरातच्या कंपनीला प्राधान्य. शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती. 7/12 उताऱ्यावर कांदा पीक दाखवले; प्रत्यक्षात द्राक्षबाग आढळल्या.
-
-
बीडच्या गेवराईमध्ये जोरदार अवकाळी पाऊस
बीडच्या गेवराईमध्ये काल गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामध्ये ज्वारीसह उन्हाळी बाजरी पीक जमीन दोस्त झाले आहे. गारांचा मारा बसल्याने धान्य देखील खराब होऊ लागले. सुरुवातीला कही ठिकाणचे पंचनामे झालेले आहेत. मात्र सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे झालेले नाहीत.
-
एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण. एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर. खरातच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघडकीस. अशोक खरातने रोख व्यवहारातून उभं केलं आर्थिक साम्राज्य.कोणताही अधिकृत हिशोब नसल्याची शक्यता. तीन दिवसांत तीनदा खरातच्या बँक खात्यांची एसआयटीकडून तपासणी. व्यवहारांची साखळी उलगडण्यास सुरुवात. मोबाईल मधून डेटा जप्त, महत्त्वाचे पुरावे हाती लागले.
-
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
छत्रपती संभाजीनगरमध्ये काल झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. वादळी वारे आणि गारपीट मुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल सायंकाळपासून जोरदार वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली. या अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कन्नड, वैजापूर, सिल्लोड, पैठण, सोयगाव आणि फुलंब्री या तालुक्यांमध्ये गारपिटीचा फटका बसला.
-
सिलिंडर आणण्यासाठी जाताना युवकाचा मृत्यू
निमार्णाधीन उड्डाणपुलाचा लोखंडी तराफा कोसळून युवकाचा मृत्यू. सिलिंडर आणण्यासाठी जाताना अमरावती जिल्ह्यातील रिध्दपूर येथे घडली घटना. ईश्वर भूरभुरे असे मृताचे नाव आहे. श्री क्षेत्र रिद्धपूर येथे तिवसा महामार्गावर रेल्वे क्रॉसिंग गेट नं.23 वर आर.व्हि.एस. कन्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे एक वर्षीपासून उड्डाण पुलाचे काम सुरू आहे.दाभेरी येथील ईश्वर भूरभुरे मित्रासोबत घरचे सिलिंडर संपल्यामुळे दुचाकीने तिवसा महामार्गावरून रिद्धपूरला जात होता.
-
रोटवद हनुमान मंदिरावर भाविकांची पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी
जळगावच्या जामनेर तालुक्यातील रोटवद हनुमान मंदिरावर भाविकांची पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी. नवसाला पावणारा मारुती, महाराष्ट्रातील सर्वात उंच मुर्ती आहे कशी आहे ही या हनुमानाच्या तीर्थक्षेत्राची ओळख.दरवर्षी हनुमान जयंतीला मध्यरात्रीपर्यंत लोणी मिश्रित शेंदूर तयार करून मुर्तीला लेपन केले जाते.मुर्ती सजावटीसाठी कागदाने हुबेहूब मनुष्याप्रमाणे मुर्तीला डोळे व इतर अवयव कागद कटिंग करून मुर्तीवर लावले जातात.
-
कल्याण-डोंबिवलीत घराच्या स्वप्नावर पाणी, वाधवा बिल्डरवर गुन्हा दाखल
कल्याण-डोंबिवलीत घराच्या स्वप्नावर पाणी. वाधवा बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. विकासकाकडून 200 हून अधिक ग्राहकांची 8 ते 10 कोटींची फसवणूक केल्याचे उघड. 90% रक्कम घेऊनही फ्लॅटचा ताबा नाही. बँकांचीही फसवणूक केल्याने भिवंडीनंतर कल्याण कोळसेवाडी पोलिसांत दुसरा गुन्हा दाखल. फसवणूक करणारी आरोपी अंकित वाधवा आणि आशिष वाधवा बंधू फरार. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता.
-
बापरे, लाडकी बहिण योजनेत इतक्या लाख बहिणी ठरल्या अपात्र
लाडकी बहीण योजनेतील पडताळणी मार्च अखेर पूर्ण. या पडताळणीत अखेर 71 लाख बहिणी अपात्र ठरल्या. त्यांना नोव्हेंबर 2024 पासून सरकार महिना 1500 रुपये अनुदान देत आहे. महिन्याला ही रक्कम 1065 कोटी होती. गेले 20 महिने या अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारने सुमारे 21 हजार 300 कोटी रुपये खर्च केले आहेत.
महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुणे, नाशिकसह 10 जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा. उकाडाही वाढणार. राज्यात सध्या बदलत्या हवामानाचा प्रभाव कायम असून अनेक भागांत पाऊस, वादळी वारे आणि गारपीट होत आहे. भारतीय हवामान विभाग यांनी गुरुवारी राज्यातील विविध भागांना पावसाचा इशारा दिला आहे. मात्र, याचसोबत पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उकाडाही वाढणार आहे. शक्तीतिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यास मान्यता. शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास केलेल्या विरोधामुळे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या पवनार ते गोवा सीमेवरील पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) दरम्यानच्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या (महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग) आखणीत बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला. सुधारित आराखड्यानुसार आता हा मार्ग 13 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांमधून जात असून माहूर, तुळजापूर, कोल्हापूर या शक्तिपीठांसह 21 धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.
Published On - Apr 02,2026 8:16 AM
