AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Corona Vaccination | औरंगाबादेत लसीकरण पूर्णत: बंद, लससाठा उपलब्ध झाला तरच सोमवारचे नियोजन

औरंगाबाद शहरातसुद्धा कोठेही लस उपलब्ध नसल्यामुळे आज (16 जुलै) लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. लससाठा उपलब्ध नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.

Aurangabad Corona Vaccination | औरंगाबादेत लसीकरण पूर्णत: बंद, लससाठा उपलब्ध झाला तरच सोमवारचे नियोजन
Corona Vaccination
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 5:46 PM
Share

औरंगाबाद : कोरोना विषाणूचे डेल्टा प्रारुप आणि संभाव्य तिसरी लाट बघता राज्य सरकारने लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवण्याचे ठरवलेले आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे या मोहिमेदरम्यान मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. औरंगाबाद शहरातसुद्धा कोठेही लस उपलब्ध नसल्यामुळे आज (16 जुलै) लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. लससाठा उपलब्ध नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. (corona vaccination is been stopped due to shortage of corona vaccine in aurangabad)

लसी मिळाल्या तर उद्यासाठी लसीकरणाचे नियोजन

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी मुकाबला करायचा असेल तर मोठ्या संख्येने लोकांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण मोहिमेत बाधा येत आहे. औरंगाबाद शहरातसुद्धा अशीच परिस्थिती आहे. औरंगाबाद शहरात सध्या लससाठा उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण पूर्णत: बंद ठेवण्यात आले आहे. आज लसी मिळाल्या तर उद्यासाठी (19 जुलै) लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार आहे. तशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

300 टोकन वाटले तरी लोकांची गर्दी

लसीकरणासाठी औरंगाबादेत ठिकठिकाणी लसीकरण केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. बजाजनगरमधील मोहटादेवी परिसरातसुद्धा एक लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, येथे 15 जुलै रोजी लसीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लोकांची गर्दी वाढल्यामुळे येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना 300 टोकन वाटले होते. मात्र, तरीसुद्धा उरलेल्या नागरिकांचा केंद्रावर गोंधळ सुरूच होता. या सर्व प्रकारामुळे आरोग्य कर्मचारी काही काळासाठी गोंधळून गेले होते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यापूर्वीसुद्धा या लसीकरण केंद्रावर अशाच प्रकारे गोंधळ उडाला होता. त्यावेळी येथे थेट पोलिसांना पाचारण करावे लागले होते.

दरम्यान, मुबलक प्रमाणात लसींचा साठा नसल्यामुळे औरंगाबादेत उपलब्ध लसीकरण केंद्रांवर नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. विविध लसीकरण केंद्रांवरील गोंधळ तसेच नागरिकांनी केकेली गर्दी यापूर्वीदेखील टीव्ही 9 मराठीने दाखवलेली आहे.

इतर बातम्या :

औरंगाबादेत एकाच दिवशी दोन मृत्यू ! एकाचा ट्रेकिंगदरम्यान तर दुसरऱ्याचा डोहात बुडून शेवट

इशारा देऊनही कार्यवाही नाही, औरंगाबाद महापालिका आयुक्तांच्या घराचे मनसे कार्यकर्त्यांनी नळ कनेक्शन कापले!

Video | औरंगाबादेत वेरुळजवळ रस्ता खचला, तब्बल 10 फुटांपेक्षाही पडला मोठा खड्डा, पूल कोसळण्याची भीती

(corona vaccination is been stopped due to shortage of corona vaccine in aurangabad)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.