AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूर-अंबरनाथ दरम्यानच्या चिखलोली स्थानकाचा मार्ग अखेर मोकळा; रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेलं बदलापूर-अंबरनाथ दरम्यानच्या चिखलोली रेल्वे स्थानकाचं भिजत घोंगडं अखेर मार्गी लागलं आहे. (chikhloli station between Ambernath, Badlapur gets railway ministry nod)

बदलापूर-अंबरनाथ दरम्यानच्या चिखलोली स्थानकाचा मार्ग अखेर मोकळा; रेल्वे मंत्रालयाची मंजुरी
| Updated on: Dec 29, 2020 | 1:35 PM
Share

ठाणे: गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेलं बदलापूर-अंबरनाथ दरम्यानच्या चिखलोली रेल्वे स्थानकाचं भिजत घोंगडं अखेर मार्गी लागलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने चिखलोली रेल्वे स्थानकाला मंजुरी दिली असून त्यामुळे या स्थानकाचे काम लवकरच सुरू होणार आहे. नवं स्थानक होत असल्याने बदलापूर आणि अंबरनाथ परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (chikhloli station between Ambernath, Badlapur gets railway ministry nod)

नव्या चिखलोली रेल्वे स्थानकाचं काम 2023 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान मोठं अंतर आहे. शिवाय चिखलोली परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रवासी आहेत. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिखलोली स्थानकाच्या बांधकामासाठी 10,947 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन (एमआरव्हीसी) हा भार उचलणार आहे. हा प्रकल्प एमयूटीपी-3 एचा भाग असणार आहे. रेल्वे प्रशासनाने चिखलोली स्थानकासाठीच्या जागेची नुकतीच पाहणी केली होती. जमिनीची मोजणीही करण्यात आली होती. कल्याण-बदलापूर दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचा चिखलोली स्थानक एक भाग असणार असल्याचं रेल्वे सूत्रांनी सांगितलं.

नवं रेल्वे स्थानक होत असल्याने प्रवासी संघटनेने रेल्वेचे आभार मानले आहेत. नव्या रेल्वे स्थानकामुळे बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदतच होणार असल्याचं प्रवासी संघटनेने म्हटलं आहे. चिखलोली स्थानक व्हावं ही गेल्या दहा वर्षांपासूनची मागणी होती. नव्या स्थानकामुळे बदलापूर-अंबरनाथ दरम्यानची गर्दी तर कमी होणार आहेच, शिवाय या दोन्ही स्थानकातील अंतरही कमी होणार आहे, असंही प्रवासी संघटनेने म्हटलं आहे.

बदलापूर आणि अंबरनाथ स्थानका दरम्यान सहा ते सात किलोमीटरचं अंतर आहे. या दोन्ही स्थानकांदरम्यान तब्बल दहा मिनिटांचं अंतर आहे. त्यामुळे चिखलोली आणि परिसरातील गावात राहणाऱ्यांना रेल्वे पकडण्यासाठी बदलापूर किंवा अंबरनाथला जावे लागते. आता नवं स्टेशन झाल्याने या नागरिकांची ही पायपीट थांबणार आहे. (chikhloli station between Ambernath, Badlapur gets railway ministry nod)

संबंधित बातम्या:

TRP Scam : अर्णब गोस्वामींकडून BARC च्या माजी सीईओला लाच, मुंबई पोलिसांचा कोर्टात दावा

सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर कंगना रनौत म्हणाली जय महाराष्ट्र

LIVE | गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का, खासदार मनसुख बसावा यांचा राजीनामा

(chikhloli station between Ambernath, Badlapur gets railway ministry nod)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक