AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, जरांगेंच्या उपोषणानंतर थेट आदेश, ते टेन्शनच मिटलं!

राज्यातील मराठा समाजासाठी मोठी बातमी आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना आता एमआयडीसीमध्ये देखील नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, जरांगेंच्या उपोषणानंतर थेट आदेश, ते टेन्शनच मिटलं!
CM Fadnavis and Manoj Jarange PatilImage Credit source: Google
| Updated on: Jun 01, 2026 | 10:30 PM
Share

राज्यातील मराठा समाजासाठी मोठी बातमी आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना आता एमआयडीसीमध्ये देखील नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रमाणपत्राच्या आधारे पात्र वारसांना MIDC मध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जरांगे पाटलांनी केली होती मागणी

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. या उपोषणानंतर सरकारने वेगाने हालचाली करत जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानंतर मध्यरात्री जरांगे पाटलांना उपोषण सोडले होते. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देताना मृत्यू झालेल्यांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकऱ्या देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता सरकारने तातडीने पावले उचलत याबाबत निर्णय घेतला आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी

मराठा आरक्षणामध्ये मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या धर्तीवर आता एमआयडीसीमध्ये देखील वारसांना नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना याबाबत आश्वासन दिले होते, त्यानंतर आता दोनच दिवसात अध्यादेश काढण्यात आला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत. मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रमाणपत्राच्या आधारे पात्र वारसांना MIDC मध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारची ही महत्त्वाची कार्यवाही मानली जात आहे.

Follow Us
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर.
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट.
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?.
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,.
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे.....
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे......
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या...
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या....
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं.
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम...