AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कागदपत्र तयार ठेवा, 3 दिवसात अर्ज…; मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन, जरांगे निवडणूक लढणार?

Manoj Jarange on Vidhansabha Election 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं. मराठा समाजाला मनोज जरांगे यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे. जरांगे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

कागदपत्र तयार ठेवा, 3 दिवसात अर्ज...; मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन, जरांगे निवडणूक लढणार?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 16, 2024 | 2:42 PM
Share

कालच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली गेली आहे. यानंतर आता राज्यात निवडणुकीचं वार वाहतं आहे. अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं आहे. कागदपत्र तयार ठेवा, असं जरांगे म्हणालेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच आता मनोज जरांगे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 20 तारखेला मनोज जरांगेंनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

निवडणूक लढण्याबाबत बैठक होणार

20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता बैठक सुरू होईल. संध्याकाळी 4 वाजता ती बैठक संपन्न होईल. त्यादिवशी आपल्याला लढायचं की पडायचं हा निर्णय घ्यायचा आहे. पण मराठ्यांनी आतापासूनच सावध राहायचं आहे. सगळ्यांनी कागद पत्रासह सगळ्यांनी तयार राहा. जर लढायच ठरलं तर तुमच्याकडे 3 दिवस अर्ज भरण्यासाठी राहणार आहेत. जर या निवडणुकीत पडायचं ठरलं तर तुमचे कागद पत्र यावं जाणार आहेत. सगळ्यांनी 20 तारखेला अंतरवाली सराटीत डबे घेऊन या, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

चर्चा करून ठरवायचं; जरांगे काय म्हणाले?

ज्यांनी निवडणुकीसाठी अर्ज केले आहेत, त्यांच्या सोबत मला चर्चा करायची आहे. उद्या महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांनी अंतरवाली सराटीत यावं. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजे पर्यंत चर्चेसाठी यावं. 2- 3 विषयांवर मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. रविवारी 20 तारखेला मराठा समाजाची बैठक होणार आहे. त्या बैठकीला ज्याला जमेल त्याने यावं, कोणाला ही बळजबरी नाही. मला माझ्या समाजाला खर्चात टाकायचं नाही. पण वेळ आली तर आपल्याला लढावं लागेल, असं मनोज जरांगे म्हणालेत.

शक्ती प्रदर्शन आता करायची गरज नाही. ही बैठक घेऊन मला कोणावर दबाव निर्माण करायचा नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी अंतरवाली सराटीत 20 तारखेला चर्चेला यावं. एकदा जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय मागे घेतला जाणार नाही, असं जरांगे म्हणाले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...