AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील’ भाजपच्या मोठ्या नेत्याचा वक्तव्याने वादाची ठिणगी

Vilasrao Deshmukh: लातूर महापालिका निवडणुकीत प्रचाराला वेग आला आहे. पण काल प्रचारादरम्यान लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असा दावा भाजपच्या बड्या नेत्याने केल्याने मोठा वाद पेटला आहे. काँग्रेसने या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला आहे. तर अमित देशमुख यांनी सुद्धा या वक्तव्यावर मोठी नाराजी व्यक्त केली आहे.

'लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील' भाजपच्या मोठ्या नेत्याचा वक्तव्याने वादाची ठिणगी
विलासराव देशमुख,
| Updated on: Jan 06, 2026 | 12:11 PM
Share

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh: लातूर शहरामधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवीन वाद ओढावून घेतला. ते काल लातूर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. सभेत बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच वाद पेटला आहे. काँग्रेसने या वक्तव्याप्रकरणी चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर आमदार अमित देशमुख यांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर अभिनेत रितेश देशमुख याने सुद्धा या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. लातूरमधील अनेक जुन्या जाणत्या राजकारण्यांनी चव्हाण यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले रवींद्र चव्हाण?

“लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. हा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही.” असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. पण त्यांच्या या वक्तव्यावर लातूरकर नाराज झाल्याचे दिसते. स्थानिक अनेक नेत्यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. लोकनेत्याचा हा अवमान असल्याची प्रतिक्रिया उमटली. आमदार अमित देशमुख यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

तर याप्रकरणी वादळ उठताच रवींद्र चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असे चव्हाण म्हणाले. लातूरमध्ये काँग्रेस हे विलासराव देशमुख यांच्या नावाने मत मागत आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने ते वक्तव्य केले. अमित देशमुख माझे चांगले मित्र आहेत. हे वक्तव्य राजकीयदृष्टीने पाहू नये. तरीही आपल्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असे चव्हाण म्हणाले.

अमित देशमुखांची तीव्र नाराजी

रवींद्र चव्हाण यांनी असं विधान करायला नको होते. लातूरची किंवा महाराष्ट्राची ही संस्कृती नाही.मी त्यांच्या विधानाचा निषेध करतो असं अमित देशमुख यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे जनतेच्या मनातील नेत्याचं नाव कुणीही पुसू शकत नाही असे अभिनेता रितेश देशमुख म्हणाले. तर काँग्रेसने याप्रकरणी संताप व्यक्त केला. चव्हाण यांनी याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली.

जो पर्यंत लातूर अस्तित्वात आहे तो पर्यंत विलासराव देशमुख यांचे नाव राहिल. विलासरावांचे नाव हे प्रत्येकाच्या हृदयात आहे, रवींद्र चव्हाण यांचे विधान दुर्दैवी असल्याचे काँग्रेस खासदार डॉ शिवाजी काळगे म्हणाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्यावर बोलताना, त्यांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लातूर मध्ये भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा होता, यावेळी बोलताना कार्यकर्त्यांना त्यांनी जयघोष करायला सांगितला.आणि त्या नंतर त्यांनी या जयघोषानंतर नक्कीच शंभर टक्के या शहरातून विलासरावांच्या आठवणी नक्कीच पुसल्या जातील असं म्हटलं आणि त्यानंतर वाद पेटला.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!