AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! VSR कंपनीची अनेक विमानं सदोष?; पायलट, कर्मचाऱ्यांनाही अपघाताची भीती, काय घडलं त्या वादळी बैठकीत? रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Rohit Pawar on VSR Company: अजितदादांच्या विमान अपघाताचे दु:ख उभा महाराष्ट्र अद्याप विसरलेला नाही. आमदार रोहित पवार हे सातत्याने व्हीएसआरच नाही तर देशातील विमान वाहतूक सुरक्षित करण्यासाठी आवाज उठवत आहेत. आता व्हीएसआर कंपनीच्या बैठकीतच कर्मचाऱ्यांनी कंपनीला घरचा आहेर दिला आहे. काय घडलं त्या वादळी बैठकीत?

मोठी बातमी! VSR कंपनीची अनेक विमानं सदोष?; पायलट, कर्मचाऱ्यांनाही अपघाताची भीती, काय घडलं त्या वादळी बैठकीत? रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
व्हीएसआर कंपनी, अजित पवार, रोहित पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 19, 2026 | 9:19 AM
Share

Rohit Pawar on VSR Company: अजितदादांच्या बारामती येथील विमान अपघाताने उभा महाराष्ट्र हादरला. एका उमद्या नेत्याला गमावल्याची भावना सर्वांनीच व्यक्त केली. व्हीएसआर कंपनी आणि तिचे मालक व्ही. के. सिंग यांच्याविरोधात आमदार रोहित पवार यांनी मोर्चा उघडला आहे. या कंपनीची विमानं सदोष आहेत. पण काही बड्या राजकीय शक्ती व्ही. के. सिंग आणि कंपनीला वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचा वरदहस्त असल्याचाही आरोप केला आहे. दरम्यान व्हीएसआर कंपनीची नुकतीच झालेली बैठक वादळी ठरली आहे. कंपनीची विमानं सदोष असल्याचा आरोप दस्तूरखुद्द कर्मचारी आणि पायलटनं केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याविषयीचा खुलासा आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केला आहे.

पायलट, कर्मचाऱ्यांचा घरचा आहेर

“अजितदादांच्या विमान अपघाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीची बहुतांश विमाने सदोष असून उड्डाणासाठी अत्यंत धोकादायक असल्याने आता कंपनीचे पायलट आणि क्रू मेंबर यांना देखील अपघाताची भीती वाटतेय. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या कंपनीच्या बैठकीत पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांनी सदोष विमानात बसण्याची भीती बोलून दाखवली, परंतु सरकारमधील काही लोकांचा वरदहस्त असल्याने ‘सरकार आपल्या पाठीशी आहे, घाबरू नका’ असा शाब्दिक धीर त्यांना देण्यात आला. पण दुर्दैवाने अपघात झाला तर व्यवस्थापनाने त्यांना दिलेल्या या शाब्दिक धीराने त्यांचा जीव वाचणार आहे का, असा प्रश्न पडतो.” असे ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना या ट्वीटद्वारे समोर आणल्या आहेत.

राज्य सरकारची व्हीएसआरवर मेहेरबानी

आता कंपनीचे कर्मचारीच व्हीएसआरची विमानं सदोष असल्याचा दावा करत असताना कंपनीवर योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सदोष विमानं असताना सरकारची कंपनीवर इतकी मेहरबानी का असा सवाल त्यांनी ट्वीटद्वारे विचारला आहे.

“एकीकडं अजितदादांच्या अपघातानंतर महाराष्ट्र सरकारने VSR कंपनीची अनेक विमानं सदोष केली, दुसरीकडे नियम आणि कायद्यांना पायदळी तुडवूनही VSR कंपनीवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळंच या कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला कुणाचीही भीती राहिली नसून दिवसेंदिवस त्याची गुर्मी वाढतच चालल्याचं दिसतंय..! तो सरकारपेक्षाही वरचढ झाला का? ज्यामुळं सरकार त्यावर कारवाई करायला घाबरतंय!” असे खरपूस समाचार त्यांनी घेतला आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत