AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajnath Singh : राजनाथ सिंह यांचं पाकिस्तानी अणवस्त्रांबद्दल मोठं वक्तव्य

Rajnath Singh : "पाकिस्तान आज अशा स्थितीत आहे, ते जिथे उभे राहतात, तिथून मागणाऱ्यांची लाईन सुरु होते. आज ते IMF कडून कर्ज घेत आहेत, आज भारत त्या देशांच्या श्रेणीमध्ये येतो, जे IMF ला पैसा देतात, जेणेकरुन गरीब देशांना कर्ज मिळेल" अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर हल्ला चढवला.

Rajnath Singh : राजनाथ सिंह यांचं पाकिस्तानी अणवस्त्रांबद्दल मोठं वक्तव्य
Rajnath Singh Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 15, 2025 | 12:56 PM
Share

“दहशतवादाविरोधात भारताची प्रतिज्ञा किती कठोर आहे, ते सगळ्या जगाने पाहिलं. आम्ही त्यांच्या न्यूक्लियर ब्लॅकमेलची पर्वा केली नाही. पाकिस्तानने अनेकदा अणवस्त्र वापरण्याच्या धमक्या दिल्या. आज मी श्रीनगरच्या भूमीवरुन सगळ्या जगाला प्रश्न विचारतो, अशा बेजबाबदार, चुकीच्या देशाच्या हातात अणवस्त्र सुरक्षित आहेत का?. पाकिस्तानची अणवस्त्र IAEA च्या आपल्या देखरेखीखाली घ्यावी” अशी मोठी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. ते जम्मू-काश्मीरमध्ये बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सैन्यदलांना धूळ चारणाऱ्या भारतीय जवानांच त्यांनी भरभरुन कौतुक केलं. आमचं सैन्य मातृभूमीच्या रक्षणासाठी न थांबता काम करतय हे अद्वितीय आहे असं राजनाथ सिंह म्हणाले.

“पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन निरपराधांना मारलं. तुम्ही जे उत्तर दिलं, ते जगाने बघितलं. भारतीयांना तुम्ही धर्म विचारुन मारलत, तर आम्ही तुम्हाला तुमचं कर्म पाहून मारलं. त्यांनी धर्म पाहून निरपराधांचा बळी घेतला. आम्ही पाकिस्तानच कर्म पाहून त्यांचा खात्मा केला. हा आमचा भारतीय धर्म आहे” असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

भारत IMF ला पैसा देतो

“एक संरक्षण मंत्री म्हणून मला तुम्हाला खूप जवळून समजण्याची संधी मिळाली. पहलगामच्या घटनेनंतर तुमच्या मनात राग होता. संपूर्ण देशात क्रोध होता. तुम्ही तुमच्या रागाला योग्य दिशा देऊन पहलगामचा बदला घेतलात” असं राजनाथ सिंह म्हणाले. “पाकिस्तान आज अशा स्थितीत आहे, ते जिथे उभे राहतात, तिथून मागणाऱ्यांची लाईन सुरु होते. आज ते IMF कडून कर्ज घेत आहेत, आज भारत त्या देशांच्या श्रेणीमध्ये येतो, जे IMF ला पैसा देतात, जेणेकरुन गरीब देशांना कर्ज मिळेल. भारताबद्दल सगळ्यांना माहित आहे. भारत शांततेला प्राधान्य देणारा देश आहे. पण जेव्हा देशाच्या संप्रभुतेवर आक्रमण होतं, तेव्हा उत्तर देणं गरजेच आहे” असं राजनाथ सिंह म्हणाले.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.