AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेच्या मैदानात NDA ची धाव कुठपर्यंत? लालबहादूर शास्त्री यांच्या नातवाने तर खोडले सर्वच दावे

Adarsh Shastri on NDA : देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांनी आपला रामराम ठोकला आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांनी एका मुलाखतीत अनेक विषयांवर आणि मुद्यांवर त्यांचे बेधडक मत मांडले.

लोकसभेच्या मैदानात NDA ची धाव कुठपर्यंत? लालबहादूर शास्त्री यांच्या नातवाने तर खोडले सर्वच दावे
NDA ला मिळतील इतक्या जागा
Follow us
| Updated on: May 25, 2024 | 3:39 PM

Lok Sabha Election 2024 : ‘जय जवान-जय किसान’ हा नारा देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता. त्यांचे नातू आदर्श शास्त्री हे पण गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतीय राजकारणात नशीब आजमावत आहे. यापूर्वी त्यांनी आपमधून उमेदवारी केली. पण केजरीवाल यांच्याशी वादानंतर त्यांनी काँग्रेसचा मार्ग निवडला. त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयावर आणि मुद्यांवर बेधडक मतं मांडली. सध्या मोदी सरकार सत्तेत परत येईल का त्यांचा ‘अब की बार 400 पारचा’ नारा खरा होईल का? याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर शास्त्री यांनी NDA केवळ इतक्या जागा मिळवेल, असा दावा केला आहे.

आपमध्ये लोकशाही नाही

उमेदीच्या काळात आदर्श शास्त्री हे बड्या आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत होते. त्यांनी आपच्या आंदोलन काळात राजकारणात उडी घेतली. द्वारका विधानसभा निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. पण देशात लोकशाही असावी. हुकूमशाही नसावी असा नारा देणाऱ्या आपमध्येच लोकशाही नसल्याचा अनुभव आल्याचे मत त्यांनी मांडले. आपवर चोहो बाजूने हल्ले होत असताना आदर्श शास्त्री यांनी पण पक्षावर तोफ डागली. आपला सोडचिठ्ठी दिली. ते काँग्रेसमध्ये दाखल झाले.

हे सुद्धा वाचा

कार्यकर्ते, नेत्यांची नाराजी

2014 आणि 2019 मधील निवडणुकीत आपने काँग्रेसची जागा घेतल्याचे शास्त्री म्हणाले. काँग्रेसची आपसोबतची हातमिळवणी कार्यकर्ते आणि नेत्यांना आवडली नाही. ते नाराज होते. पण पक्ष नेतृत्वासमोर भाजप आणि पीएम मोदी यांच्या विरोधाची मोठी लढाई होती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र भाजप, मोदींविरोधात येण्याचा निर्णय घेतला असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मग एनडीएला किती जागा मिळतील?

‘अब की बार 400 पार’ असा नारा भाजपने दिला आहे. या नाऱ्यावरुन देशभरात एकच काहूर माजले. भाजपसोबतच्या मित्रपक्षांनी पण या नाऱ्यावर नाराजी व्यक्त केली. काहींनी हा नार जनतेला रुचला नसल्याचे भाकित केले. याविषयी आदर्श शास्त्री यांनी पण त्यांचे मत व्यक्त केले. इंडिया आघाडी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विक्रमी जागांनी विजयी होईल, असा दावा त्यांनी केला. तर एनडीएला 200-220 जागांवर समाधान मानावे लागेल असे ते म्हणाले. भाजपवर लोक नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांना लोकसभेत फटका बसेल, असा सूर त्यांनी आळवला.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.