AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई कुठे काय करते’ मालिकेत रंजक ट्विस्ट; सुरू होणार नवा अध्याय

'आई कुठे काय करते' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत आता नवा अध्याय सुरू होत असून 'महाराष्ट्राची सुगरण जोडी' स्पर्धेत भाग घेऊन अरुंधती नवं आव्हान स्वीकारणार आहे.

| Updated on: Jul 09, 2024 | 9:47 AM
Share
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'मध्ये महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धा सुरू होणार आहे. अरुंधतीने या स्पर्धेत भाग घेत नवं आव्हान स्वीकारलं आहे. अरुंधतीला या स्पर्धेत मिहीर शर्मा साथ देणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'मध्ये महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धा सुरू होणार आहे. अरुंधतीने या स्पर्धेत भाग घेत नवं आव्हान स्वीकारलं आहे. अरुंधतीला या स्पर्धेत मिहीर शर्मा साथ देणार आहे.

1 / 5
अरुंधती आणि मिहीरला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अनिरुद्ध आणि संजनानेदेखील कंबर कसली आहे. त्यामुळे स्पर्धा चुरशीची होणार हे मात्र नक्की. अरुंधतीची स्वयंपाकाची आवड सर्वांनाच माहित आहे.

अरुंधती आणि मिहीरला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अनिरुद्ध आणि संजनानेदेखील कंबर कसली आहे. त्यामुळे स्पर्धा चुरशीची होणार हे मात्र नक्की. अरुंधतीची स्वयंपाकाची आवड सर्वांनाच माहित आहे.

2 / 5
या स्पर्धेत उतरण्याचं कारण फक्त स्वयंपाकाची आवड इतकंच नाही. तर अरुंधतीला आपलं घर म्हणजेच समृद्धी निवास वाचवायचं आहे. अनिरुद्ध-संजनाने घरावर हक्क दाखवलाय. समृद्धी निवास पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची गरज आहे आणि म्हणूनच ती महाराष्ट्राची सुगरण स्पर्धेत भाग घेणार आहे.

या स्पर्धेत उतरण्याचं कारण फक्त स्वयंपाकाची आवड इतकंच नाही. तर अरुंधतीला आपलं घर म्हणजेच समृद्धी निवास वाचवायचं आहे. अनिरुद्ध-संजनाने घरावर हक्क दाखवलाय. समृद्धी निवास पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची गरज आहे आणि म्हणूनच ती महाराष्ट्राची सुगरण स्पर्धेत भाग घेणार आहे.

3 / 5
अरुंधतीला साथ देणारा मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. त्यामुळे ही जोडी या स्पर्धेत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहेत. मात्र अरुंधती जिंकू नये यासाठी अनिरुद्ध आणि संजनादेखील या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे 'आई कुठे काय करते' मालिकेतली ही स्पर्धा उत्कंठावर्धक होणार यात शंका नाही.

अरुंधतीला साथ देणारा मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. त्यामुळे ही जोडी या स्पर्धेत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहेत. मात्र अरुंधती जिंकू नये यासाठी अनिरुद्ध आणि संजनादेखील या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे 'आई कुठे काय करते' मालिकेतली ही स्पर्धा उत्कंठावर्धक होणार यात शंका नाही.

4 / 5
मालिकेत पहिल्यांदा अशाप्रकारची स्पर्धा होत असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे. मालिकेची संपूर्ण टीम हा सीन करताना खूप धमाल करत आहेत. ही उत्कंठावर्धक चुरस प्रेक्षकांना 'आई कुठे काय करते' या मालिकेत दुपारी 2.30 वाजता पहायला मिळेल.

मालिकेत पहिल्यांदा अशाप्रकारची स्पर्धा होत असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे. मालिकेची संपूर्ण टीम हा सीन करताना खूप धमाल करत आहेत. ही उत्कंठावर्धक चुरस प्रेक्षकांना 'आई कुठे काय करते' या मालिकेत दुपारी 2.30 वाजता पहायला मिळेल.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.