AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : आता उठवू सारे रान, हंडाभर पाण्यासाठी नगरच्या रणरागिणींचा एल्गार…!

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील कोऱ्हाळे गावठाण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.

| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 4:42 PM
Share
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील कोऱ्हाळे गावठाण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दोन तास ठिय्या आंदोलन करूनही ठोस आश्वासन मिळत नसल्याने महिलांनी कार्यालयास टाळे ठोकले.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील कोऱ्हाळे गावठाण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दोन तास ठिय्या आंदोलन करूनही ठोस आश्वासन मिळत नसल्याने महिलांनी कार्यालयास टाळे ठोकले.

1 / 7
आंदोलक महिलांना उद्या पाणी सोडू, असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले. मात्र, त्यानंतरही पाणी मिळत नसल्याने पुन्हा महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सकाळपासून भर उन्हात आंदोलन करत असूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेण्यात आली नाही.

आंदोलक महिलांना उद्या पाणी सोडू, असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले. मात्र, त्यानंतरही पाणी मिळत नसल्याने पुन्हा महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सकाळपासून भर उन्हात आंदोलन करत असूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेण्यात आली नाही.

2 / 7
ग्रामपंचायतीने कर वसुलीची नोटीस काढल्याने अनेक ग्रामस्थांनी कराची रक्कम अदा केली. मात्र, तरीही ग्रामपंचायत वेगवेगळी कारणे सांगून विशिष्ट भागातील रहिवाशांना पाणी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

ग्रामपंचायतीने कर वसुलीची नोटीस काढल्याने अनेक ग्रामस्थांनी कराची रक्कम अदा केली. मात्र, तरीही ग्रामपंचायत वेगवेगळी कारणे सांगून विशिष्ट भागातील रहिवाशांना पाणी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

3 / 7
४. आश्वासन देऊनही पाळले नाही. त्यानंतर आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे महिला संतापल्या. त्यांनी कोऱ्हाळे ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. मात्र, त्यात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे टँकरने पाणी देण्याचे ग्रामपंचायतीने मान्य केल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

४. आश्वासन देऊनही पाळले नाही. त्यानंतर आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे महिला संतापल्या. त्यांनी कोऱ्हाळे ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. मात्र, त्यात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे टँकरने पाणी देण्याचे ग्रामपंचायतीने मान्य केल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

4 / 7
महाराष्ट्रात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पुराने हाहाकार उडवला. मात्र, पाण्याच्या नियोजनाचा अभाव असल्याने सातत्याने कुठे ना कुठे तरी पाणी टंचाईची ओरड सुरू असते. त्यात महापालिका, नगपरिषद आणि ग्रामपंचायतींचा कारभार कौतुकास्पद असतो. त्याचा फटका नागरिकांना बसतो.

महाराष्ट्रात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पुराने हाहाकार उडवला. मात्र, पाण्याच्या नियोजनाचा अभाव असल्याने सातत्याने कुठे ना कुठे तरी पाणी टंचाईची ओरड सुरू असते. त्यात महापालिका, नगपरिषद आणि ग्रामपंचायतींचा कारभार कौतुकास्पद असतो. त्याचा फटका नागरिकांना बसतो.

5 / 7
सत्ता कोणत्याही पक्षाची असो निदान पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य सुविधांची दिलेली आश्वासने तरी पाळावीत, अशी मागणी यावेळी कोऱ्हाळे येथील आंदोलक महिलांनी केली. दिवसभरातील चार तास जर पाणी आणण्यात जात असतील, तर आम्ही करायचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सत्ता कोणत्याही पक्षाची असो निदान पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य सुविधांची दिलेली आश्वासने तरी पाळावीत, अशी मागणी यावेळी कोऱ्हाळे येथील आंदोलक महिलांनी केली. दिवसभरातील चार तास जर पाणी आणण्यात जात असतील, तर आम्ही करायचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

6 / 7
अहमदनगर जिल्ह्यातील कोऱ्हाळे येथील महिला हे पाण्यासाठी भटकणारे एक प्रतिकात्मक उदाहरण म्हणता येईल. महाराष्ट्रातील अनेक खेडेगावात अजूनही पाण्याची बोंब आहे. दिवाळी संपली की, पाणी संकट सुरू होते. अनेक महापालिका हद्दीतही रोज पाणी येत नाही. हे सर्व संपणार कधी, याचे उत्तर काळच देईल.

अहमदनगर जिल्ह्यातील कोऱ्हाळे येथील महिला हे पाण्यासाठी भटकणारे एक प्रतिकात्मक उदाहरण म्हणता येईल. महाराष्ट्रातील अनेक खेडेगावात अजूनही पाण्याची बोंब आहे. दिवाळी संपली की, पाणी संकट सुरू होते. अनेक महापालिका हद्दीतही रोज पाणी येत नाही. हे सर्व संपणार कधी, याचे उत्तर काळच देईल.

7 / 7
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.