AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : आता उठवू सारे रान, हंडाभर पाण्यासाठी नगरच्या रणरागिणींचा एल्गार…!

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील कोऱ्हाळे गावठाण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.

| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 4:42 PM
Share
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील कोऱ्हाळे गावठाण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दोन तास ठिय्या आंदोलन करूनही ठोस आश्वासन मिळत नसल्याने महिलांनी कार्यालयास टाळे ठोकले.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील कोऱ्हाळे गावठाण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दोन तास ठिय्या आंदोलन करूनही ठोस आश्वासन मिळत नसल्याने महिलांनी कार्यालयास टाळे ठोकले.

1 / 7
आंदोलक महिलांना उद्या पाणी सोडू, असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले. मात्र, त्यानंतरही पाणी मिळत नसल्याने पुन्हा महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सकाळपासून भर उन्हात आंदोलन करत असूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेण्यात आली नाही.

आंदोलक महिलांना उद्या पाणी सोडू, असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले. मात्र, त्यानंतरही पाणी मिळत नसल्याने पुन्हा महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सकाळपासून भर उन्हात आंदोलन करत असूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेण्यात आली नाही.

2 / 7
ग्रामपंचायतीने कर वसुलीची नोटीस काढल्याने अनेक ग्रामस्थांनी कराची रक्कम अदा केली. मात्र, तरीही ग्रामपंचायत वेगवेगळी कारणे सांगून विशिष्ट भागातील रहिवाशांना पाणी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

ग्रामपंचायतीने कर वसुलीची नोटीस काढल्याने अनेक ग्रामस्थांनी कराची रक्कम अदा केली. मात्र, तरीही ग्रामपंचायत वेगवेगळी कारणे सांगून विशिष्ट भागातील रहिवाशांना पाणी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

3 / 7
४. आश्वासन देऊनही पाळले नाही. त्यानंतर आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे महिला संतापल्या. त्यांनी कोऱ्हाळे ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. मात्र, त्यात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे टँकरने पाणी देण्याचे ग्रामपंचायतीने मान्य केल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

४. आश्वासन देऊनही पाळले नाही. त्यानंतर आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे महिला संतापल्या. त्यांनी कोऱ्हाळे ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. मात्र, त्यात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे टँकरने पाणी देण्याचे ग्रामपंचायतीने मान्य केल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

4 / 7
महाराष्ट्रात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पुराने हाहाकार उडवला. मात्र, पाण्याच्या नियोजनाचा अभाव असल्याने सातत्याने कुठे ना कुठे तरी पाणी टंचाईची ओरड सुरू असते. त्यात महापालिका, नगपरिषद आणि ग्रामपंचायतींचा कारभार कौतुकास्पद असतो. त्याचा फटका नागरिकांना बसतो.

महाराष्ट्रात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पुराने हाहाकार उडवला. मात्र, पाण्याच्या नियोजनाचा अभाव असल्याने सातत्याने कुठे ना कुठे तरी पाणी टंचाईची ओरड सुरू असते. त्यात महापालिका, नगपरिषद आणि ग्रामपंचायतींचा कारभार कौतुकास्पद असतो. त्याचा फटका नागरिकांना बसतो.

5 / 7
सत्ता कोणत्याही पक्षाची असो निदान पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य सुविधांची दिलेली आश्वासने तरी पाळावीत, अशी मागणी यावेळी कोऱ्हाळे येथील आंदोलक महिलांनी केली. दिवसभरातील चार तास जर पाणी आणण्यात जात असतील, तर आम्ही करायचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सत्ता कोणत्याही पक्षाची असो निदान पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य सुविधांची दिलेली आश्वासने तरी पाळावीत, अशी मागणी यावेळी कोऱ्हाळे येथील आंदोलक महिलांनी केली. दिवसभरातील चार तास जर पाणी आणण्यात जात असतील, तर आम्ही करायचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

6 / 7
अहमदनगर जिल्ह्यातील कोऱ्हाळे येथील महिला हे पाण्यासाठी भटकणारे एक प्रतिकात्मक उदाहरण म्हणता येईल. महाराष्ट्रातील अनेक खेडेगावात अजूनही पाण्याची बोंब आहे. दिवाळी संपली की, पाणी संकट सुरू होते. अनेक महापालिका हद्दीतही रोज पाणी येत नाही. हे सर्व संपणार कधी, याचे उत्तर काळच देईल.

अहमदनगर जिल्ह्यातील कोऱ्हाळे येथील महिला हे पाण्यासाठी भटकणारे एक प्रतिकात्मक उदाहरण म्हणता येईल. महाराष्ट्रातील अनेक खेडेगावात अजूनही पाण्याची बोंब आहे. दिवाळी संपली की, पाणी संकट सुरू होते. अनेक महापालिका हद्दीतही रोज पाणी येत नाही. हे सर्व संपणार कधी, याचे उत्तर काळच देईल.

7 / 7
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.