AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : आमिर खानपेक्षा किरण राव शिक्षणात ‘एक पाऊल पुढे’, आमिर केवळ 12 वी पास तर किरण….

किरण राव आणि आमिर खानने डिसेंबर 2005 मध्ये लग्न केलं होतं. 2000 साली आमिरने आपली पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्फोट घेतला. (Amir khan Kiran Rao Divorce Kiran Rao Education Amir Khan Qualification)

| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 04, 2021 | 2:13 PM
Share
मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ख्याती असलेला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) आणि त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. किरण रावने चित्रपटाची निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून काम केलं आहे. किरणने बर्‍याच चित्रपटांची निर्मिती केली असून याबरोबर ती चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्याचंही काम करते. तिने अनेक चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे.

मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ख्याती असलेला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) आणि त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. किरण रावने चित्रपटाची निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून काम केलं आहे. किरणने बर्‍याच चित्रपटांची निर्मिती केली असून याबरोबर ती चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्याचंही काम करते. तिने अनेक चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे.

1 / 6
किरण राव आणि आमिर खान या प्रसिद्ध जोडीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर चाहत्यांना अनेक प्रश्न पडले. मग त्यांच्या बालपणापासून, शिक्षणापासून ते संपत्तीपर्यंत.... आपण आज दोघांच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊयात... किरण राव आमिरपेक्षा शिक्षणाने एक पाऊल पुढे आहे म्हणजेच आमिरला सरस आहे. तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळवलीय. किरणने प्रॉडक्शन, स्टोरी राइटिंग, स्क्रिप्ट राइटिंग, डायरेक्शन करुन बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय.

किरण राव आणि आमिर खान या प्रसिद्ध जोडीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर चाहत्यांना अनेक प्रश्न पडले. मग त्यांच्या बालपणापासून, शिक्षणापासून ते संपत्तीपर्यंत.... आपण आज दोघांच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊयात... किरण राव आमिरपेक्षा शिक्षणाने एक पाऊल पुढे आहे म्हणजेच आमिरला सरस आहे. तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळवलीय. किरणने प्रॉडक्शन, स्टोरी राइटिंग, स्क्रिप्ट राइटिंग, डायरेक्शन करुन बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय.

2 / 6
किरण रावचा जन्म 7 नोव्हेंबर 1973 रोजी तेलंगणामध्ये झाला. किरण राव जनापल्ली असं तिचं पूर्ण नाव आहे. किरणच्या आजोबांचे नाव जनकपल्ली जे. रामेश्वर राव होते. जे तेलंगणाचे राजा होते. किरणचं बालपण कोलकाता शहरात गेलं, तिने आपले प्राथमिक शिक्षण लोरेटो हाऊसमधून घेतले. 1992 मध्ये तिचे आई-वडील कोलकाता सोडून मुंबईला आले.

किरण रावचा जन्म 7 नोव्हेंबर 1973 रोजी तेलंगणामध्ये झाला. किरण राव जनापल्ली असं तिचं पूर्ण नाव आहे. किरणच्या आजोबांचे नाव जनकपल्ली जे. रामेश्वर राव होते. जे तेलंगणाचे राजा होते. किरणचं बालपण कोलकाता शहरात गेलं, तिने आपले प्राथमिक शिक्षण लोरेटो हाऊसमधून घेतले. 1992 मध्ये तिचे आई-वडील कोलकाता सोडून मुंबईला आले.

3 / 6
मुंबईत आल्यानंतर किरणने सोफिया कॉलेजमधून कला विषयात पदवी घेतली. त्यानंतर ती दिल्लीला गेली. तिथे तिने जामिया मिलिया इस्लामिया, दिल्ली येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. किरणने अर्थशास्त्र विषयात पदवी आणि मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स केलं. लगान या ब्लॉकबस्टर चित्रपटापासून तिने आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. लगान या चित्रपटामध्ये किरण रावने सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली. तर आमिरने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

मुंबईत आल्यानंतर किरणने सोफिया कॉलेजमधून कला विषयात पदवी घेतली. त्यानंतर ती दिल्लीला गेली. तिथे तिने जामिया मिलिया इस्लामिया, दिल्ली येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. किरणने अर्थशास्त्र विषयात पदवी आणि मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स केलं. लगान या ब्लॉकबस्टर चित्रपटापासून तिने आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. लगान या चित्रपटामध्ये किरण रावने सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली. तर आमिरने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

4 / 6
किरण राव आणि आमिर खानने डिसेंबर 2005 मध्ये लग्न केलं होतं. 2000 साली आमिरने आपली पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्फोट घेतला. आमिर खानला बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. त्याचे चित्रपट देश-विदेशात खूप प्रसिद्ध आहेत. आमिर खानने फक्त बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. आमिरने वांद्रे, मुंबई येथील सेंट हायस्कूलमधून 5 वी ते 8 वी शिक्षण घेतले आहे. त्याने बॉम्बे स्कॉटिश स्कूल माहीम मुंबईमधून नववी ते दहावीचे शिक्षण तर नर्सी माँजी कॉलेजमधून 12 वीचे शिक्षण घेतले आहे.

किरण राव आणि आमिर खानने डिसेंबर 2005 मध्ये लग्न केलं होतं. 2000 साली आमिरने आपली पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्फोट घेतला. आमिर खानला बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. त्याचे चित्रपट देश-विदेशात खूप प्रसिद्ध आहेत. आमिर खानने फक्त बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. आमिरने वांद्रे, मुंबई येथील सेंट हायस्कूलमधून 5 वी ते 8 वी शिक्षण घेतले आहे. त्याने बॉम्बे स्कॉटिश स्कूल माहीम मुंबईमधून नववी ते दहावीचे शिक्षण तर नर्सी माँजी कॉलेजमधून 12 वीचे शिक्षण घेतले आहे.

5 / 6
किरण रावने अकॅडमी अवॉर्ड नॉमिनेटेड दिग्दर्शक मीरा नायर यांच्या चित्रपटाच्या मान्सून वेडिंगला देखील असिस्ट केलं होतं. याशिवाय किरणने 'जाने तू या जाने ना', 'पीपली लाइव्ह', 'धोबी घाट', 'डेली बेली', 'तलाश', 'दंगल', 'सिक्रेट सुपरस्टार', सारख्या बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. आकडेवारी पाहिल्यास किरण रावने आमिर खानपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केली आहे.

किरण रावने अकॅडमी अवॉर्ड नॉमिनेटेड दिग्दर्शक मीरा नायर यांच्या चित्रपटाच्या मान्सून वेडिंगला देखील असिस्ट केलं होतं. याशिवाय किरणने 'जाने तू या जाने ना', 'पीपली लाइव्ह', 'धोबी घाट', 'डेली बेली', 'तलाश', 'दंगल', 'सिक्रेट सुपरस्टार', सारख्या बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. आकडेवारी पाहिल्यास किरण रावने आमिर खानपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केली आहे.

6 / 6
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली